Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’च्या रूपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली चाकणकर यांनी २९ जुलैला महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी २७ जुलैला चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. २९ जुलैला चाकणकर यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.


‘सामान्य लोकांच्या मनातील खदखद आणि प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाईल’, अशी स्पष्ट भूमिका नूतन प्रदेशाध्यक्षांनी मांडली. त्या म्हणाल्या, ‘कोण पक्ष सोडून गेले म्हणून पक्षाचे काम थांबत नाही. ३६५ दिवस आव्हाने सुरूच असतात. निश्चितच चांगल्या पद्धतीने काम केले जाईल. जे आव्हान येईल त्याला तोंड देण्याची आमची तयारी असणार आहे. दोन दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरू करून संघटना चांगल्या पद्धतीने बांधली जाईल.’

या वेळी आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव, युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह मुंबईतील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZFGCC
 राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निवड झाली त्या बद्दल त्यांच अभिनंदन
Similar Posts
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबर २०१८ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, या दौऱ्यामध्ये अकोला जिल्हा, ग्रामीण आणि तालुका कार्यकारिणीच्या आढावा बैठका व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ कमिटीचा मेळावा घेणार आहेत,’ अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language